नारायणी धाम कडे जाणारा रस्ता खोदून आज 100 दिवस झाले, पण अजून रस्ता बनवण्यात आला नाही, त्या मुळे प्रवास करताना नागरिकांना होत आहे त्रास रस्ता खोदून १५ दिवस झाले होते त्या नंतर काही दुरुस्ती चे काम करण्यात आले. ते दुरुस्ती करून आता ८५ दिवस झाले. एकूण १०० दिवस झाले पण अजून रस्ता काही दुरुस्त करण्यात नाही आला. त्या खड्डयापासून ५० मीटर अंतरावर पॅचवर्क करून रस्ता दुरुस्त केला पण हा खड्डा जसाकाय दिसलाच नाही हा रस्ता पुणे मुंबई महामार्ग ला लागून असल्याने इथे नेहमी वाहतूक कोंडी होत असते एकाच बाजूने ये जा करावी लागत आहे, लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, हा रास्ता पुढे नारायणी धाम ( मंदिर ) व कैवल्यधाम ( योग इन्स्टिटयूट ) कडे जातो. नारायणी धाम मधे भरपूर पर्यटक येतात ज्यांचा वोल्वो बसेस या ठिकाणी खड्या मुले अडकतात,तसेच कैवल्यधाम हे एक इंटरनॅशनल योग इन्स्टिटयूट असून इथे विदेशी लोक भरपूर येतात, त्यांना हि ह्याचा खूप त्रास होतआहे रात्रीच्या वेळी इथे काहीहि दिसत नसल्यामुले अपघात होतात. कृपया लोकांच्या जीवाशी खेळू नका. विशेष म्हणजे लोणावळा मुख्याध...